Tuesday, September 24, 2019

जल जतन की विश्व जल-विग्रह? (मराठी लघूलेख)

    

                
पाण्याची कमतरता!  


मानव युगामध्ये पाण्याचे महत्व कितीआहे हे वेगळे सांगायची गरज नाही. मानवी -संस्कृती, जिथे-जिथे नद्या होत्या तिथे-तिथेच फोफावली आहे. 
परंतु आज देशापुढे पाण्याची उपलब्धता,  ही एक समस्या उभी ठाकलेली आहे जी कालांतराने देशव्यापी व विश्वव्यापी   समस्या होऊ शकते !!
परिणामी, विश्व जल-विग्रह (WORLD WATER WAR) निर्माण होईल हे नक्कीच !
पाण्यामुळे विकसीत झालेली मानवी संस्क्रुती आपल्या हाताने आपण संपुष्टात आणत आहोत. ह्याचे मुख्य कारण, जनसंख्या खूप वेगाने वाढत आहे. एकीकडे स्वच्छ पाण्याचा साठा आपण निष्काळजी पूर्वक उपसत आहोत, दुसरी कडे आपण पावसातून नवीन साठा निर्माण करत नाही! आपल्या देशात पावसाचे पाणी अमाप उपलब्ध आहे.
मानवी स्वभाव:
मनुष्याची एक खोड असते. जोपर्यंत स्वत: समस्येत अडकत नाही तोपर्यंत त्या समस्याकडे तो दुर्लक्ष करीत राहतो.
आपण प्रसार माध्यमातून पाहतोय की काही लोक पाणी मिळवण्यासाठी आपले अख्खे आयुष्य खर्ची करीत आहेत. तरी देखिल पाण्याचा अपव्यय सर्रास चालू आहे. ही एक नुसती वाईट सवय नाही, तर पाण्याच्या ह्या वाढत्या तुटवड्यामुळे    आपण हा एक गुन्हा करत आहोत. व त्याची आपल्याला जाणीव देखील होत नाही, हे किती मोठे दुर्भाग्य म्हणावे लागेल.
जे पाण्याचा अपव्यय करतात, त्यांना वाया जाणार्या पाण्याची किंमतच कळत नाही! एक एक थेंबासाठी तडपून तडपून प्राण सोडणार्या जीवांची तडफड दिसत नाही! आणि दिसली तरी उमजत नाही कारण जोपर्यंत ते स्वत: ह्या समस्येत सापडत नाहीत तोपर्यंत त्यांना त्याचे गांभिर्य कळत नाही, त्याची पीडा जाणवत नाही.
शहरात किंवा नगरात, जेंव्हा पुरवठा पाईपातून पाण्याची गळती होते तेंव्हा  त्याची दुरुस्ती करण्यास कित्येकदा तासन् तास तर कधी कधी चक्क १ ते २  दिवस लागतात. काय म्हणावे ह्या शासकीय उदासीनते विषयी? आणि हीं दुर्लक्षितता लोक देखील अंगीकृत करतात.

ऐपत वाढली म्हणजे दुसर्यांच्या जगण्याचा हक्क हुसकावण्याचा अधिकार मिळतो, असे आहे का?

उद्योग व घरगूती वापरण्यात आलेले दुषित पाणी आपण मोठ्या प्रमाणात नद्या-नाल्यात सोडतो, अशा तर्हेने स्वच्छ पाण्याचा साठा एकीकडे आपण कमी करत चाललोय तर दुसर्या बाजूने लोकसंख्या वाढवून भूगर्भ पाण्याचा  साठा आपण झपाट्याने संपवत चाललो आहे.

एक दिवस असा उजाडेल की लोक फक्त पाण्यासाठीच एकमेकांशी लढतील. आणि मग हे जल- विग्रह म्हणजे World Water War जगभर पसरेल.

परिणाम
:
आज देशात, अनेक ठिकाणी लोक जमिनी खालील पाणी सतत उपसून  भूजल पातळी कमी करत चालले आहेत.

त्यावर प्रगती साठी जमिन सिमेंट व डांबरने लिंपुन अस्तित्वात असलेली व्रुक्ष-झाडी तोडत चाललो आहोत. आणि नविन झाड लावायचे काम पण बर्यांचदा होत नाही. झालेच तर फोटो-विडीयो साठी व्रुक्ष लागवडीचे कार्यक्रम राबविले जातात, पुढे मात्र तिची जोपासना कोणीही करत नाही. केवळ दिखाव्यासाठी व्रुक्षारोपण का करायचे ? त्याच्या सिंचनाची जवाबदारी कोण घेणार?
लातूरमध्ये पाण्याच्या गंभिर समस्येमुळे धारा १४४ लागू केले होते जे जमाव बंधी थोपवण्यासाठी कलम आहे!  म्हणजे, पाण्यासाठी लोक लढायला उतरले होते!
https://economictimes.indiatimes.com/news/politics-and-nation/section-144-of-crpc-for-peaceful-water-distribution-in-latur-maharashtra/articleshow/51491551.cms?from=mdr

आपला देश क्रुशीप्रधान असल्यामुळे सिंचनासाठी भुमीपाण्याचा जास्तीत जास्त वापर होत आहे. मोठ्या प्रमाणात व अयोग्य प्रकारे पाणी वापर व चूकीचे      व्यवस्थापन ह्या भयावह परिस्थिसाठी जवाबदार आहेत.

मग विश्व जल-विग्रह म्हणजे WORLD WATER WAR फार दुर नाही, हे निश्चितच!

काय करावे?
1. जेंव्हा आपल्याला विकास कामासाठी वृक्ष तोडायची गरज भासते, तेंव्हा ती वृक्ष न तोडता त्यांचे चक्क   स्थलांतर  करावे. ही पद्धत परदेशात अवलंबली जाते.

https://twitter.com/thingswork/status/1042086188050472960?lang=en

परंतु आपल्या देशात मात्र ह्यावर कोणताही विचार होत नाही..  

नविन झाडी लावली तरी ती व्रुक्ष व्हायला कैक वर्षे लागतात. मात्र तोवर, प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्ष तोडल्यामुळे वातावरणावर दुष्परिणाम होतो. 

ही बाब सर्वांनी लक्षात ठेवावी.

2. प्रकल्पग्रस्त क्षेत्रात सुनियोजित पणे वृक्ष लागण करावी, त्यांना  जोपासावे. विकास कामाची ही अट असावी.पाणी व व्रुक्ष हे दोन्ही एकमेकांसाठी पुरक आहेत. दोघांपैकी एकाचे प्रमाण जरी कमी झाले तरी दुसर्यावर त्याचा विपरीत परिणाम नक्की होतो, आणि 
हा परिणाम मानव जातीला मारक आहे. आपले अस्तित्व टिकवण्यासाठी जल व व्रुक्ष ह्यांचे जतन करणे आपले परम कर्तव्य आहे.

भूगर्भाचा जल-साठा:

https://socialissuesindia.wordpress.com/2017/12/27/alarming-fall-in-groundwater-levels-in-india/amp  

विश्वाच्या एकूण लोकसंख्ये पैकी १८% लोक भारतात राहतात व पिण्याच्या व वापराच्या जगाच्या एकुण  साठ्यापैकी ४% साठा आपल्या देशात आहे.

एका अहवालानुसार गेल्या दशकात १३ करोड ६० लाख भारतीय  पिण्याच्या पाण्यापासून वंचित होते.

http://business.rediff.com/slide-show/2009/dec/11/slide-show-1-water-crisis-what-india-is-doing.html

निती आयोगाने कोम्पोझिट वोटर मेनेजमेंट इंडेक्स द्वारे जुन २०१८मध्ये सादर केलेल्या अहवालात नोंदलेआहे की सन २०२० पर्यत दिल्ली शिवाय २१ शहर्यांची भुजल पातळी संपुर्णपणे संपुष्टात येईल.

https://pib.gov.in/PressReleaseIframePage.aspx?PRID=1582772

उपाय :

ह्या समस्येवर उपाय म्हणून पेय जल वाढविण्यासाठी सन १९८४ साली केंद्र सरकारने गंगा एक्षन प्लान आखला होता ज्या अंतर्गत गंगा सफाईचे काम सुरू केले होते. आज सुद्धा ह्या संपुर्ण नदीची व देशातील इतर नद्यांची तसेच नाला, सरोवर ह्यांची पुर्णपणे सफाई होत नाही. होते फक्त पावसाळ्याच्या तोंडावर ती पण थातूरमातूर.

आपल्या सभोवती असलेला नाला व सरोवर, मात्र कचरा विसर्ग करण्याचे 

ठिकाणच आहे ही समज लोकांच्या मनातून जो पर्यंत जात नाही तो पर्यंत  स्वच्छ पाण्याचा साठा अशुद्धच राहणार. लोक शिक्षीत असले तरी देशाच्या  कर्तव्यविषयी मात्र बेध्यान आहेत. काही अशिक्षीत लोक मात्र ह्या सुशिक्षीत  लोकांपेक्षा अधिक जागरुक व  शिस्तीत आढळतात, व त्यांच्याकडून पाण्याचा अपव्यय होत नाही.

आज महानगरात व शहरात स्वच्छ पाण्याची घरगूती गरज ७०% आहे, जी पुरवण्यात शासन संपुर्णपणे अपयशी ठरलेय. ह्याला कारण आपली  स्फोटक जनसंख्या आहे. ग्रामिण भागात फक्त १९% लोकांना पाईपा-द्वारे पाणी मिळत आहे . उर्वरीत लोक मात्र जमिनी खालील असलेल्या  साठावरतीच, मुख्यत: विहरीवर व साधारण १०० फुट खोललेल्या ट्युब वेल  वर अवलंबून आहेत. व दिवसेंदिवस ह्या पाण्याचा उपसा चालूच आहे.

जमिनी पाण्याशिवाय आज आपल्या देशात शुद्ध पाण्याचा देखिल तुटवडा भासू लागलाय. जमिनी पाणी  संवर्धनासाठी शासनाने कठोर नियमांची अंमल बजावणी न केल्यामुळे शुद्ध पाण्याच्या साठवड्यावर ह्याचा खुपच  ताण पडलाय. नोकरशाहीची उदासीनता व सततच्या निष्काळजीपणा मूळे ही समस्या अधिकच गंभीर होउ  लागली आहे. सरकारी नियंत्रणाच्या  अभावामुळे व औद्योगिक कचर्यांचे संपुर्णत: नद्या-नाल्यात चालू असलेले  विसर्ग, ह्या बाबींमुळे शुद्ध पाण्याचा तुटवडा वाढतच चाललाय.

हा औद्योगिक कचरा व घरगूती दुषित पाणी, नद्यांना ९०% दुषित करते. 

शिवाय जनसंख्या व्रुद्धीमुळे जमिनीतील शुद्ध पाण्याचा साठा झपाट्याने संपत येत आहे.

ह्या समस्येतुन बाहेर पडण्यासाठी लोकांनीच पुढाकार घेतला पाहिजे.

ह्याचा उत्तम उदहारण म्हणजे अहमदनगरच्या पाल्वे बुद्रूक क्षेत्रातील  ग्रामस्थांनी स्वकष्टाने, यशस्वीपणे करून दाखवलेली कामगीरी.

सरकारी जल संवर्धन योजनेची योग्य अंमलबजावणी व स्वत:साठी  अवलंबलेले नियम ह्या बाबीमुळे आज तिथे घरोघरी पिण्याचे पाणी मिळत  आहे. शिवाय भूगर्भ जलाची पातळी वाढवण्यात मदत मिळते. ह्यात  लोकांच्या शिस्तीचा खुप मोठा भाग आहे.

पाहू या काय आहे हे पालवे बुद्रुक?

ह्या गावाचे उप-पंचायत श्री गंगाधर कलमकर ह्यांनी ह्या चमत्कारी कामगिरी विषयी माहिती दिली:

"२२०० कुटुंब असलेल्या आमच्या ह्या गावात सर्व घरात पाईपाद्वारे पाण्याची  सोय असुन सुद्धा दरवर्षी दोन ते तीन महिन्यासाठी आम्हाला पाण्याची टंचाई भासू लागली.

हवामानात होत असलेला बदल, पावसाची बदलती रचना, ह्यामुळे ही  परिस्थिती अधिकच गंभीर होउ लागली.

मग आम्हाला शासकीय योजना व युनिसेफची साथ लाभली.

आम्ही नव्वदच्या दशकात अहमदनगरच्या सरकारी केंद्रात गेलो. तिथे  संस्थेने आम्हाला आर्थिक सहाय्य व  तकनीकी सल्ला तर दिलाच पण  पाणलोट क्षेत्र निर्माण करण्यासाठी गावात आवश्यक ते फेरबदल  करण्यासाठी  देखिल मार्गदर्शन केले.

सर्वप्रथम, आम्ही ३५ हजार लिटर क्षमतेची एक टाकी बसवली व तिथुन घरोघरी पाईप जुळणी केली. 

जलसंवर्धनेसाठी १४०० हेक्टर जमीन म्हणजे जवळ जवळ गावाची ८0 %  जमीन, आम्ही पाणलोट क्षेत्र म्हणुन विकसीत केली. ज्यात ३ रोधी बांध किंवा धरण तपासा, २० नाला बंड, मुख्य टाकीला जोडून २ लहान परिच्छेद टाक्या म्हणजे परकोलेशन टेंक व १९ तलावांची आम्ही रचना केली."

संपुर्ण ग्रामस्थांनी ह्यात सहर्श भाग घेतला. ग्रामसभेनी नेमलेली समिती सर्व  निर्णयाची अंमलबजावणी करते. ग्रामसभेत, जल संवर्धनाविषयीचे सगळे निर्णय घेतले जातात.

ग्रामस्थांनी केवळ कामातच मदत नाही केली, तर निर्वाह-निधीची स्थापना  देखिल केली, जेणेकरून सर्व कामांची अंमलबजावणी शक्य झाली.

इतकेच नव्हे, तर पिण्याच्या पाणी साठी काही नियमावली देखिल आखली, व ती कटाक्षाने पाळली जाते.

पर्कोलेशन टेंकमधील पाणी हे फक्त घरकामासाठी वापरले जाते. रोज  सकाळी १ तास पाईपांद्वारे सोडलेले पाणी हे फक्त पिण्यासाठी साठवले जाते व जेवणासाठी वापरण्यात येते.

अशा तर्हेने त्यांनी दुष्काळग्रस्त परिस्थितीवर नुसती मात नाही केली, तर  पाण्याची किंमत काय आहे हे जगाला दाखवून दिले.

ह्याच महाराष्ट्रच्या पुर्वेला विदर्भ व मराठवाड्याकडे पाहीले तर अगदी विपरीत व भयावह परिस्थिती पहायला दिसते.

ह्या क्षेत्राला पाणीटंचाईने संपुर्णपणे ग्रासले आहे. पाण्या अभावी, शेती  उत्पादन ठप्प झाले आहे, शेतकरी कर्ज-बाजरी झाला आहे, दुष्काळ पसरला आहे, परिणामी शेकडो शेतकर्यांनी आत्महत्या केली आहे.

हा विरोधाभास का?

ह्यास कैक कारणे आहेत.

जलसिंचनचा पुर्णत्व: अभाव :

मध्य व पुर्व महाराष्ट्र मध्ये उसाची मोठ्या प्रमाणात लागवड.

उसाला भरपूर पाणी लागते, साखर लोबीच्या नादात नेत्यांनी ह्या पीकाला गरजेपेक्षा जास्त महत्त्व दिले आहे,  ज्यामागे केवळ साखर लॉबीचा राजकीय स्वार्थ आहे.

राज्याच्या एकुण पीक उत्पादना पैकी उसाचे प्रमाण मात्र ९% आहे, परंतु त्यासाठी लागणार्या पाण्याला अधिक  प्राधान्य दिले गेले. ह्या मुळे पुर्व महाराष्ट्राला अव्यवस्थित पाणी पुरवठा होत गेला.

जसे क्रिकेटमध्ये धावा कमी वा धीम्या झाल्यावर ASKING RATE जसा वाढत जातो तसे ह्या क्षेत्रात पाण्याची मांग वाढतच गेली व त्यात पावसाचे घटत चाललेले प्रमाण भुजलावर प्रचंड दबाव आणत गेले. शिवाय शेतकरी  वैयक्तिक कारण म्हणजे लग्नासारख्या बाबींवर वारेमाप खर्चासाठी कर्जबाजारी होत गेला. 

ह्या शिवाय बीज-बियाणे कर्ज वगैरे बाबींमुळे शेतकरी हवालदिल होत गेला.  त्यात शासनाची शेतकर्यांसाठी  असलेली कमालीची उदासीनता ह्या सर्व गोष्टीमुळे पाणीटंचाई अवाक्याबाहेर होत गेली. शेतकरी आत्महत्या  करीत राहीले.

अशा असह्य परिस्थितीना सामोरे जाण्या ऐवजी वेळीच आपण पालवे बुद्रुक चा द्रुष्टांत ठेऊन, तसेच लोकहिताचा व भविष्याचा विचार करुन ताबडतोब पाउले उचलावी अन्यथा आपली भावी पिढी ज्यांसाठी निसर्गाचा नाश करुन आपण प्रगती करित आहोत ते आपल्याला कधीच क्षमा करणार नाही व त्यांचे भविष्य देखिल संपुष्टात येईल.


No comments: